०६ मार्च, २०११

काळ आला आणि वेळही

सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते वंदिनस्ताः कथाः
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥

ती सुंदर नगरी, तो ताकदवान राजा, त्याचे विश्वासू सरदार, त्याच्या आश्रयाने राहणारी विद्वान लोकांची सभा , चंद्राप्रमाणे सुंदर चेहऱ्याच्या स्त्रिया , उदंड असा राजपुत्रांचा समूह , स्तुती गाणारे देशी/ विदेशी भाट आणि त्या भाटांनी गायलेल्या त्या उत्तमोत्तम स्तुती हे सर्व गेले कुठे? वेळ बदलली. सद्दी संपली. वर्तमानाला इतिहासाच्या पानात ढकलून सतत पुढे जाणार्‍या काळाला नमस्कार करण्यावाचून आपल्या हातात काय आहे? सध्या जगात जे चालू आहे त्याला काळाचा आणखी एक महिमा असेच म्हणता येईल.