१२ जानेवारी, २०२०

स्पर्धापरीक्षेचा खरा धोका

राजन गवस यांचा "सुत्तडगुत्तड : स्पर्धापरीक्षेची लष्करअळी” हा लेख वाचण्यासारखाः
https://www.loksatta.com/chaturang-news/armyworm-of-the-competition-exam-abn-97-2020627/

लेखाचा सारांश असाः
नोकऱ्याच नसतील, असलेल्या वशिल्याशिवाय मिळतच नसतील, तर शिकायचं कशाला, अशी मानसिकता तयार होत असतानाच यूपीएससी, एमपीएससीची लष्करअळी कोणीतरी गावात आणून सोडली. जागा कमी, परीक्षा देणाऱ्यांची संख्या कैक लाखांत. एक परीक्षा, दोन परीक्षा करत करत तिशी उंबऱ्यावर येऊन ठेपली आणि समोर सगळा अंधारच दिसायला लागला.. आईबाप कंगाल झाले. उमेदीची वर्षे मातीत गेली. या भयंकर साथीच्या अळीनं त्यांची आयुष्यंच बरबाद केली. याला जबाबदार कोण? हजारात एक होत असेल अधिकारी पण या नऊशे नव्याण्णवांचे काय?

हे वास्तव नक्कीच चिंताजनक आहे. पण माझ्यामते खरी समस्या वेगळी आणि अधिक गंभीर आहे. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली जो अभ्यास करून घेतला जातो त्याचा बहुतांश भाग हा "माहिती" या स्वरूपाचा असतो. म्हणजे अमुक एका नेत्याचे निधन कोणत्या वर्षी झाले? अमुक एक शासन पुरस्कार कोणाला मिळाला?  त्यातही विद्यार्थ्याला जातीयवादी बनविणारे कित्येक प्रश्न असतात. उदा. अमुक एक जात ओबीसी वर्गात मोडते का? अमुक एक जात तमूक एका जातीच्या वरची की खालची (असा प्रश्न डायरेक्ट नव्हे तर अप्रत्यक्षरीत्या विचारलेला) सध्या मार्केटमध्ये  मागणी असलेले अभ्यासक्रम म्हणजे "डेटा सायन्स”, "मशिन लर्निंग”, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स" यांची त्यांना गंधवार्ताही असत नाही. जातीयवादी आणि कंपूबाजी याचा सराव झाला की कोणत्यातरी राजकीय / सामाजिक  पक्षात आपोआप प्रवेश होतो आणि जीवनाची दिशाही बदलते. ही दशा मात्र खात्रीने अधोगतीकडे घेऊन जाते!