१४ जानेवारी, २०२६

ब्राह्मी लिपी आणि शून्याचा शोध

 कित्येक युरोपियन विद्वानांनी असा ग्रह करून घेतला आहे की हिंदू सुरवातीला लिहिणे जाणतच नसत,  त्यांनी हेही ठरविले की हिंदूंची प्राचीन लिपि (ब्राह्मी) ही हिंदूंनी तयार केली नसून त्यांनी ती इतरांकडून घेतली.  तीदेखील साधारण दोन हजार वर्षांपूर्वी. त्या आधी सर्व साहित्य मौखिक परंपरेने जतन होत असे. असे मानण्याचे कारण की कार्बन डेटिंग पद्धतीने शास्त्रमान्य पुरावा फक्त दोन हजार वर्षांपर्यंतचा मिळत आहे. त्या आधीचे काहीच शीलालेख वगैरे मिळत नाहीत. आता याला काय उत्तर देणार? मला माझ्या ४ ते ५ पिढ्यांपर्यंतच्या आजोबा - पणजोबांची नावे माहीत आहेत. त्या आधीच्या पूर्वजांची नावे मला माहीत नाहीत म्हणजे त्या आधी मला कोणी पूर्वजच नव्हते असा त्याचा अर्थ होतो का? 

माझा युक्तिवाद बालिश समजून सोडून देऊ.  कदाचित भारताचा अभिमान असल्यामुळे मी असे बोलत असेन. पण रायबहादुर पंडित गौरीशंकर हीराचंद ओझा यांनी लिहिलेल्या "प्राचीन भारतीय लिपिमाला" या पुस्तकाच्या प्रस्तावनेची सुरुवातच पहा त्यांनी कशी केली आहे...

 

प्राचीन काळी संस्कृति, सभ्यता व विद्येच्या क्षेत्रांत आर्यांनी अत्युच्च स्थान प्राप्त केले होते. आर्य संस्कृतीचे मूळ स्थानही आशिया खंड असून येथून सर्व जगात धर्म, विद्या, सभ्यता, संस्कृति वगैरेंचा प्रकाश पसरलेला आहे. आशिया खंडातील भारतीय, इराणी व असीरियन लोक आणि आफ्रिका खंडातील इजिप्शियन लोक हे खूपच उन्नतावस्थेला पोचले होते, पण काळाच्या प्रवाहात कोणाचीही स्थिति नेहमीच सारखी राहू शकत नाही. अनेक राज्यक्रांत्या होत होत अखेर इराण, असीरिया आणि इजिप्त हे देश आपल्या प्राचीन वाङ्मयापासून वेगळे पडले आणि त्यांचे वंशज आपल्या संस्कृतीला दुरावले. पण भारतातील आर्यांनी मात्र अनेक संकटे सोसूनही आपल्या प्राचीन सभ्यतेला आणि संस्कृतीला भूषणावह असे आपले बरेचसे प्राचीन वाङ्मय सांभाळून ठेवले. त्यामुळे जगाचे लोक आज विद्येच्या बाबतीत भारताचे कमी-अधिक प्रमाणात ऋणी आहेत.

त्यानंतर त्यांनी असे म्हटले आहे...

मानवाने आपल्या बुद्धीचा उपयोग करून सर्वात मोठी अशी जी दोन कामे करून ठेवली आहेत, ती म्हणजे भारताची ब्राह्मी लिपि व अर्वाचीन नागरी अंक व त्यांचा विकास. जगातील अत्यंत पुढारलेल्या लोकांच्या लिप्या या विसाव्या शतकातही अजून तशाच मागासलेल्या आहेत. ध्वनि व त्यांची सूचक-चिन्हे (अक्षरे) यांत मेळच नाही, त्यामुळे एकाच चिन्हाने अनेक ध्वनि प्रकट होतात, तर एकाच ध्वनीसाठी अनेक चिन्हे वापरली जातात. अक्षरांचा क्रमही शास्त्रीय असा मुळीच नाही. काही ठिकाणी तर अजूनही वर्णात्मक अक्षराऐवजी चित्रात्मक अक्षरेच वापरली जातात. मानवजातीला मिळालेल्या ज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेतून अजून त्या लिप्या मुळीच बाहेर आलेल्या नाहीत. पण भारताची लिपि ही हजारो वर्षांपूर्वीही इतक्या उच्च पदाला पोचली होती की जगातील एकही लिपि अजून तिच्या बरोबरीने श्रेष्ठतेत पुढे येऊ शकली नाही. फोनोग्राफचे ध्वनि व त्यांच्या तबकडीवरील चिन्हांचे जसे संबंध आहेत, नेमके तसेच संबंध या लिपीतील ध्वनि व लिखित अक्षरे यांच्यात आहेत. प्रत्येक आर्य ध्वनीसाठी वेगवेगळी चिन्हे असल्यामुळे आपण जसे बोलतो, तसेच नेमके यात लिहिले जाते व जसे लिहितो, तसेच बोलले जाते. संपूर्ण वर्णक्रम शास्त्रीय पद्धतीने ठरवून टाकला गेला आहे. इतके सौकर्य इतर कोणत्याही लिपीत नाही.


 जगाची अंक-विद्या प्राचीन काळात प्रारंभिक अवस्थेतच होती. कधी वेगवेगळ्या अंकांसाठी अक्षरेच लिहिली जात होती, तर कधी एकम्‌ची १ ते ९ पर्यंतची ९ चिन्हे, दहम्ची १० ते ९० पर्यंतची दुसरी ९ चिन्हे आणि शतम् व सहस्राचीही अशीच वेगवेगळी चिन्हे होती. आणि या २० चिन्हांनी फक्त एक लक्षापेक्षा कमीच संख्या मोजली जाऊ शकत असे. त्यामुळे अभिप्रेत असलेली संख्या फक्त त्या त्या  चिन्हांनी कळत असे. भारतातही अंकांचा हाच प्राचीन क्रम चालू होता, पण अशा क्लिष्ट अंकक्रमाने गणित विद्येत प्रगति करून घेणे अशक्य होते. म्हणून येथील लोकांनी अर्वाचीन अंकक्रम शोधून काढला. १ ते ९ पर्यंतचे ९ अंक आणि रिक्त स्थळ-सूचक 'शून्य' अशा १० चिन्हांनी आज संपूर्ण अंक-विद्येचे काम भागते. हा अंक क्रमही जगाने भारतापासूनच घेतला. अर्वाचीन काळात गणित विद्येची किंवा तिच्याशी संबंधित इतर शास्त्रांची जी प्रगति होऊ शकली, तीही या अंकक्रमामुळेच.

भारताच्या आर्यांची बुद्धि व विद्या किती प्रगत अवस्थेप्रत पोचली होती, याचे अनुमान वरील दोनच गोष्टींवरून केले जाऊ शकते. याच दोन विषयांसंबंधाने व त्यांच्या वेळोवेळच्या रूपांतरासंबंधाने माहिती व त्याचे विवेचन या पुस्तकात दिले आहे.

यानंतर ब्राह्मी लिपीची उत्पत्ती या लेखात ते म्हणतात...

पुढे चीनमध्येही संस्कृत-प्राकृतचे अध्ययन होऊ लागले. वेळोवेळी तेथील अनेक विद्वानांनी चिनी भाषेत बौद्ध धर्मासंबंधी अनेक ग्रंथांची निर्मिती स्वतः केली. त्यांत भारतासंबंधीही अनेक प्राचीन गोष्टी लिहिलेल्या आहेत. इ. स. ६६८ मध्ये बौद्ध विश्वकोष (फा युअन चु लिन्) तयार झाला. त्यात 'ललितविस्तर' यात म्हटल्याप्रमाणे ६४ लिप्यांची नावे दिली आहेत व पहिले नांव 'ब्राह्मी'चे आणि दुसरे खरोष्ठीचे (किअ-लु-से-टो क-लु-से-टो खरो-स-ट = खरोष्ठ) आहे. खरोष्ठी लिपीचा तपशील देताना असे म्हटले आहे की चिनी भाषेत या शब्दाचा अर्थ 'गाढवाचे ओष्ठ' असा होतो." त्या पुस्तकात निरनिराळ्या लिप्यांचे जे वर्णन दिले आहे, त्यांत म्हटले आहे की 'लेखनकलेचा शोध तीन दैवी शक्तीने संपन्न अशा आचार्यांनी केला असून त्या सर्वात प्रसिद्ध असे आचार्य 'ब्रह्मा' आहेत व त्यांची लिपि (ब्राह्मी) ही डावीकडून उजवीकडे वाचली जाते. दुसरे आचार्य किअ-लु (किअ-लु-से-टो = खरोष्ठचे संक्षिप्त रूप) आहेत व त्यांची लिपि उजवीकडून डावीकडे वाचली जाते. सर्वात कमी महत्त्वाचे आचार्य 'त्सं-की' आहेत. यांची (चिनी) लिपि ही वरून खाली, अशी वाचली जाते. ब्रह्मा व खरोष्ठ हे भारतात झाले आणि त्सं की चीनमध्ये. ब्रह्मा व खरोष्ठ यांना आपापल्या लिप्या देवलोकातून मिळाल्या आणि त्सं-की यांनी आपली लिपि पक्षी इत्यादींच्या पावलांच्या चिन्हावरून बनविली.    (रिपोर्ट ऑन एन्शंट एन्स्क्रीप्शन्स ऑफ सीलोन -  मॅक्समूलर Page 24) https://dn790003.ca.archive.org/0/items/ancientinscripti01mluoft/ancientinscripti01mluoft.pdf

जी लिपि डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, तिचे प्राचीन नांव 'ब्राह्मी' असून जी लिपि उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, तिचे नांव खरोष्ठी होते, हे या चिनी पुस्तकाच्या लेखावरून स्पष्ट होते. ब्राह्मी लिपि या देशाची स्वतंत्र व सार्वदेशिक अशी लिपि असल्यामुळेच जैन व बौद्ध ग्रंथही त्यातच लिहिले जाऊ लागले व म्हणूनच त्यांनी लिप्यांच्या नामावलीत तिचे नाव सर्वप्रथम दिले.

ब्राह्मी लिपी आणि शून्याचा शोध लावल्यावर पुढे करण्यासारखे काहीच न उरल्यामुळे भारतातील नंतरच्या पिढ्या झोपी गेल्या का? असा प्रश्न मला विचारला तर मात्र माझ्याकडे काही उत्तर नाही!


०३ जानेवारी, २०२६

Activity Log Privacy Policy

 Privacy Policy

GaMaBhaNa built the Activity Log app as a Free app. This SERVICE is provided by GaMaBhaNa at no cost and is intended for use as is.

This page is used to inform visitors regarding my policies with the collection, use, and disclosure of Personal Information if anyone decided to use my Service.

If you choose to use my Service, then you agree to the collection and use of information in relation to this policy. The Personal Information that I collect is used for providing and improving the Service. I will not use or share your information with anyone except as described in this Privacy Policy.

The terms used in this Privacy Policy have the same meanings as in our Terms and Conditions, which are accessible at Activity Log unless otherwise defined in this Privacy Policy.

Information Collection and Use

For a better experience, while using our Service, I may require you to provide us with certain personally identifiable information. The information that I request will be retained on your device and is not collected by me in any way.

The app does use third-party services that may collect information used to identify you.

Link to the privacy policy of third-party service providers used by the app

Log Data

I want to inform you that whenever you use my Service, in a case of an error in the app I collect data and information (through third-party products) on your phone called Log Data. This Log Data may include information such as your device Internet Protocol (“IP”) address, device name, operating system version, the configuration of the app when utilizing my Service, the time and date of your use of the Service, and other statistics.

Cookies

Cookies are files with a small amount of data that are commonly used as anonymous unique identifiers. These are sent to your browser from the websites that you visit and are stored on your device's internal memory.

This Service does not use these “cookies” explicitly. However, the app may use third-party code and libraries that use “cookies” to collect information and improve their services. You have the option to either accept or refuse these cookies and know when a cookie is being sent to your device. If you choose to refuse our cookies, you may not be able to use some portions of this Service.

Service Providers

I may employ third-party companies and individuals due to the following reasons:

  • To facilitate our Service;
  • To provide the Service on our behalf;
  • To perform Service-related services; or
  • To assist us in analyzing how our Service is used.

I want to inform users of this Service that these third parties have access to their Personal Information. The reason is to perform the tasks assigned to them on our behalf. However, they are obligated not to disclose or use the information for any other purpose.

Security

I value your trust in providing us your Personal Information, thus we are striving to use commercially acceptable means of protecting it. But remember that no method of transmission over the internet, or method of electronic storage is 100% secure and reliable, and I cannot guarantee its absolute security.

Links to Other Sites

This Service may contain links to other sites. If you click on a third-party link, you will be directed to that site. Note that these external sites are not operated by me. Therefore, I strongly advise you to review the Privacy Policy of these websites. I have no control over and assume no responsibility for the content, privacy policies, or practices of any third-party sites or services.

Children’s Privacy

These Services do not address anyone under the age of 13. I do not knowingly collect personally identifiable information from children under 13 years of age. In the case I discover that a child under 13 has provided me with personal information, I immediately delete this from our servers. If you are a parent or guardian and you are aware that your child has provided us with personal information, please contact me so that I will be able to do the necessary actions.

Changes to This Privacy Policy

I may update our Privacy Policy from time to time. Thus, you are advised to review this page periodically for any changes. I will notify you of any changes by posting the new Privacy Policy on this page.

This policy is effective as of 2023-08-25

Contact Us

If you have any questions or suggestions about my Privacy Policy, do not hesitate to contact me at shantanu.oak@gmail.com.

२० नोव्हेंबर, २०२५

मराठी भाषा: संशोधन आणि ग्रंथसंवर्धन

 'मराठी भाषा: धोरण आणि अंमलबजावणी'  या विषयावर सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स, पुणे यांनी एक दिवसीय चर्चासत्र 8 ऑक्टोबर 2023 रोजी पुणे येथे आयोजित केले होते.  त्यातील काही निबंध आणि भाषणे दत्ता घोलप आणि संग्राम गायकवाड यांनी संपादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. या पुस्तकाचे प्रकाशन भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते १ मार्च २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे झाले. नुकतेच ते पुस्तक माझ्या वाचनात आले. त्यातील "मराठी भाषा: संशोधन आणि ग्रंथसंवर्धन" या लेखातील नीतीन रिंढे यांचे विचार:

 _____

उदाहरणार्थ, आमच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात दुर्मीळ ग्रंथ आणि नियतकालिकांची लाखो पानं आहेत की ज्यांचं डिजिटायजेशन करणं गरजेचं आहे. त्याचा खर्च कोट्यवधी रुपये आहे आहे. सरकारसमोर बराच पाठपुरावा  करून याबद्दलची योजना आम्ही मांडली. त्यासाठी अनुदान मागितलं. सरकारने ते मजूर केलं. पाच कोटी रुपये मंजूर झाले. पैकी तीन कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यावर देखील जमा झाले. सरकारी अनुदान असल्याने त्याचे टेंडर्स वगैरे निघण्यासाठी वेळ लागतो. त्यात काही काळ गेला. आता काम सुरू होणार, तेवढ्यात सरकार बदललं आणि नव्या मंत्र्याच पत्र आलं की ते पैसे वापरायचे नाहीत. नव्या सरकारच्या अर्थमंत्री, उच्चशिक्षण मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार झाला. त्यांना अनेकदा विनंती केली की तुम्ही पैसे मंजूर केले आहेत, दिलेही आहेत. आता ते फक्त वापरण्यावर बंदी घातली आहे, तो आदेश मागे घ्या. अद्याप निर्णय नाही.

तेव्हा हा एक महत्त्वाचा विषय आहे. गेल्या दोनशे वर्षांत प्रसिद्ध झालेली मराठी पुस्तकं, नियतकालिकांचे अंक यांचं सांस्कृतिक मूल्यमापन आपण करणार आहोत की नाही? त्यांचं मोल आपण जाणणार आहोत की नाही? आणि जर याचं मोल आपण जाणत असू, तर हा वारसा जपण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही? फक्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात नव्हे, तर महाराष्ट्रातल्या इतरही अनेक संग्रहालयांनी दुर्मीळ पुस्तकं, नियतकालिकं गेली कित्येक दशकं सांभाळली आहेत. त्यांचं पुढे काय होणार आहे? ते सर्व नष्ट होणार का ?

परवा अमेरिकेतल्या रटगर्ज विद्यापीठातल्या प्राध्यापक अंजली नेर्लेकर यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी 'बॉम्बे पोएट्स' नावाचं संग्रहालय (अर्काइव्ह) अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठात उभारलं आहे. मराठीतल्या लघुनियतकालिक चळवळीतल्या कवींची हस्तलिखितं, पत्रव्यवहार, कागद हे सर्व त्यांनी अर्काइव्हसाठी नेलं आहे. त्यांना मी म्हटलं की हे सर्व साहित्य भारतातच कुठंतरी ठेवलं गेलं पाहिजे. म्हणजे इथल्या लोकांना अभ्यासासाठी ते वापरता येईल. दोनतीन वर्षांपूर्वी त्यांनी हे काम केलं होतं. त्या मला म्हणाल्या, तुमचं म्हणणं मला आता पूर्ण पटतं. दोन कारणांसाठी : एक, त्या विद्यापीठाचे नियम एवढे कठोर आहेत, की मीच ते अर्काइव्ह तयार करूनसुद्धा मलाच ते आता सहजासहजी पाहता येत नाही. आणि दुसरं असं की महाराष्ट्रातल्या कोणाला त्या कवींवर काही काम करायचं असेल, तर त्यासाठी त्याला या संग्रहाचा काही उपयोग होणार नाही. कारण तिथून संदर्भ मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि महागडी आहे; पण तरीही केवळ एका कारणामुळे मला हा संग्रह तिकडे न्यावा लागला. ते कारण म्हणजे. भारतात अशा प्रकारचा संग्रह कठही जपून ठेवला जाईल याची खात्री नाही. दहा-पंधरा-वीस वर्षं राहीलही; पण पुढे त्या संस्थेचं काय होईल याचंच भवितव्य निश्चित नसतं  विद्यापीठांची अवस्था काय आहे हेही आपल्याला माहीत आहे.' त्या पुढं म्हणाल्या की अशोका विद्यापीठ अशा कामात पुढाकार घेत आहे; पण शेवटी भारतातलं राजकीय पर्यावरण इतकं वाईट आहे आणि ते इतक्या वेगवेगळ्या दिशांनी बदलत असत, की त्यात अमे संग्रह भरडले जाण्याचीच शक्यता अधिक आहे. अमेरिकेतल्या विद्यापीठात ते दोनशे वर्षं सुरक्षित तरी राहील. अशी सध्या भारतातली स्थिती आहे.

ग्रंथ आणि नियतकालिकांच्या रूपाने असलेल्या सांस्कृतिक वारशाविषयी उदासीनता आहे. त्याचं मोल कळत नाही. अशा परिस्थितीत या वारशाचं काय होणार हा प्रश्न आहे. यात भाषाविभाग काय करू शकतो हे पाहता येईल. त्यासाठी सर्वप्रथम ग्रंथालय संचालनालय भाषा विभागाकडे येणं गरजेचं आहे. खरं म्हणजे प्रा. अ. का. प्रियोळकर यांनी ग्रंथसंवर्धन कसं करता येईल आणि ग्रंथांचा वापर अधिकाधिक कसा वाढवता येईल याविषयी पूर्वीच सांगून ठेवलं आहे. ग्रंथांचा, जुन्या संदर्भाचा वापर आपल्याकडे फार कमी लोक करतात; पण संशोधनासाठी जुने ग्रंथ, नियतकालिकं यांचं संवर्धन गरजेचं असतंच. ते समाजाने केलंच पाहिजे.

दोन गोष्टी तातडीने झाल्या पाहिजेत. पहिली गोष्ट ब्रिटिश काळापासून स्थापन झालेल्या ग्रंथालयांमध्ये जी पुस्तकं आहेत, त्यांची सूची एकत्रितपणे कुठंतरी तयार झाली पाहिजे. जुन्या पुस्तकांपैकी अमुक एक पुस्तक कुठल्या ग्रंथालयात उपलब्ध आहे, याची ऑनलाइन नोंद असली पाहिजे. यासाठी सगळ्या ग्रंथालयांचं एक जाळं तयार होण्याची गरज आहे. छोट्या पातळीवर असा प्रयत्न झाला आहे. सरकार तर हे सहज करू शकतं. granthalaya.org ही वेबसाइट ठाण्याच्या बेडेकर संस्थेने तयार केलेली आहे. त्यावर महाराष्ट्रातल्या १७-१८ ग्रंथालयांचे कॅटलॉग ठेवलेले आहेत. त्या वेबसाइटवर आपण एखाद्या पुस्तकाचा ठावठिकाणा तपासू शकतो. तिथं नोंदवलेल्या ग्रंथालयांपैकी एखाद्या ठिकाणी जर ते पुस्तक असेल, तर त्याची नोंद वेबसाइटवर सापडते. हे काम सरकारतर्फे राज्य मराठी विकास संस्था करू शकते. महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या ग्रंथालयांमधल्या ग्रंथांच्या नावांच्या याद्या एकत्र करून त्यांबा ऑनलाइन एका ठिकाणी साठा करायचा. जेणेकरून आपल्याकडे काय आहे. याची तरी माहिती आपल्याला होईल.

दूसरं काम असं की आतापर्यंत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच जतन कस करावं याची एक पद्धत ठरवावी लागेल. प्रा. प्रियोळकरांनी त्याबद्दल सांगितलं आहे. पुस्तकाची वर्गवारी कशी करावी? दुर्मीळ पुस्तक कशाला म्हणावं?  इत्यादी. काही गोष्टींची व्याख्या आता नव्याने करावी लागेल. उदाहरणार्थ, 

दुर्मीळ पुस्तकांची प्रियोळकरांनी सांगितलेली कालमर्यादा आता बदलेल. तो काळ आपल्याला आणखी अलीकडे घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, १९५० पूर्वीचं दुर्मीळ, १९०० पूर्वीच अतिदुर्मीळ अशी वर्गवारी आपल्याला करावी लागेल.  प्रियोळकरांनी त्यातले अनेक बारकावे सांगितले आहेत. उदाहरणार्थ, एखादं पुस्तक २००० साली जरी प्रसिद्ध झालं असेल आणि त्याची नवी आवृत्ती पुढे निघणार नसेल, तर ते दर्मीळच म्हणावं लागेल. यानुसार सगळ्या ग्रंथालयांतल्या पुस्तकांच्या याद्या झालेल्या असतील. तेव्हा त्यांचं संगणकीकरण सुरू करावं लागेल.

सर्व ग्रंथालयांतल्या पुस्तक-संग्रहांची संपूर्ण सूची हाती असल्यामुळे कुठल्या ग्रंथालयातला संग्रह मौल्यवान आहे, किती प्रमाणात आहे वगैरे गोष्टी सहज ध्यानात येतील. हे काम सरकारने, राज्य मराठी विकास संस्थेमार्फत सुरू केलं आहे. त्यांनी अनेक पुस्तकं स्कॅन केली आहेत. काहींच्या पीडीएफ आणि इ-बुक्सही बनवली आहेत. ती त्यांच्या वेबसाइटवर उपलब्धही आहेत; पण या कामात सुसूत्रता नाही. सगळी सरकारी प्रकाशनांची पुस्तकं त्यांनी इ-बुक्सच्या रूपाने ऑनलाइन टाकलेली आहेत; पण त्याशिवाय जे साहित्य ऑनलाइन आहे, त्यात काही पुस्तकं आहेत तर काही नियतकालिकं आहेत.

आता अशा प्रकारचे संगणकीकरणाचे प्रकल्प महाराष्ट्रात अनेक संस्थांमध्ये स्वतंत्रपणे सुरू आहेत. उदाहरणार्थ, पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेने त्यांच्या ग्रंथालयातल्या संग्रहाचं संगणकीकरण पूर्ण केलं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट आणि एशियाटिक सोसायटीने केलं आहे. काही महाविद्यालयांच्या ग्रंथालयांनीही आपल्याकडच्या दुर्मीळ संग्रहाचं संगणकीकरण केलं आहे; पण यात होतं असं की काही पुस्तकं अनेक ठिकाणी संगणकीकृत होतात. तर काही पुस्तकं यातून निसटून मागे पडतात. अशी पुस्तक संगणकाच्या पडद्यापर्यंत पोहोचतच नाहीत. यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने स्वतः संगणकीकरण करण्याऐवजी महाराष्ट्रातल्या सर्व ग्रंथालयांमध्ये समन्वय साधून या कामात सुसूत्रता आणली पाहिजे. सर्व सूची तयार झाली की कुठली पुस्तकं संगणकीकृत झाली आणि कुठली व्हायची आहेत, याचा मागोवा घेता येईल. मागे राहिलेल्या पुस्तकांसाठी योजनाबद्ध रितीने संगणकीकरणाचं काम राबवता येईल. हे दोन-चार वर्षांत होणार काम नक्कीच नाही. हे काम दहा-पंधरा-वीस वर्ष चालत राहील.

हे काम एक सामूहिक काम आहे हे ध्यानात घेऊन त्याची आखणी करावी लागेल. म्हणजे समजा राज्य मराठी विकास संस्थेने समन्वयाची जबाबदारी घेतली. की मग त्या त्या ग्रंथालयाला आर्थिक अनुदान देऊन ते काम ग्रंथालयाच्या पातळीवर करून घेणं आणि त्यानंतर ते एका ठिकाणी ऑनलाइन संग्रहीत करण अशी त्याची पद्धत असेल.

आणखी एक गोष्ट इथे सांगायला हवी. महाराष्ट्रातल्या बऱ्याच ग्रंथालयामधून जुनी पुस्तक किंवा खराब झालेली पुस्तक नियमितपणे काढून टाकली जातात मुंबईतल्या फूटपाथवरच्या दुकानांतून कधी कधी खूप महत्त्वाची किंवा दुर्मीळ पुस्तकं विक्रीसाठी आलेली दिसतात. यात अशा ग्रंथालयांतून काढून टाकलेल्या पुस्तकांचं प्रमाण अधिक असतं. कधी कधी ही पुस्तकं थेट लगदा करण्यासाठी कारखान्यात पोहोचतात आणि कायमची नष्ट होतात. प्रियोळकरांनी पूर्वी सांगून ठेवलं आहे की ज्याच्या महाराष्ट्रात अगदी मोजक्या प्रती शिल्लक आहेत किंवा जे जवळजवळ उपलब्ध नाही, अशा पुस्तकाला 'अतिदुर्मीळ' असा विशेष दर्जा  देऊन ते पुस्तक ग्रंथसंग्रहातून किंवा ग्रंथालयातून काढून टाकण्यावर बंदी घाततो पाहिजे. यावर आणखीही एक उपाय आहे. १९५० किंवा १९२० अशी एक निश्चित कालमर्यादा घ्यावी. त्यापूर्वीचं कुठलंही पुस्तक हे मौल्यवान मानत जावं. कुठल्याही पुस्तकाला एक सांस्कृतिक मूल्य असतं. एखादी १८६० साली छापली गेलेली दहा पानांची पुस्तिका जरी असेल, तरी तिला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्य आहे. त्या काळात त्या पुस्तिकेने काय भूमिका बजावली होती हे पाहायचं असेल तर ती पुस्तिका उपलब्ध झाली पाहिजे. त्यासाठी अमुक वर्षापूर्वीचं कुठलंही पुस्तक असलं, तरी ते कुठल्याही ग्रंथालयाला काढून टाकता किंवा नष्ट करता येणार नाही अशा आशयाचा नियम करावा लागेल. अशी पुस्तक जर एखाद्या ग्रंथालयाला नको असतील, ती वाळवीने खाल्ली असतील किंवा खराब झाली असतील, तर सरकारने अशा पुस्तकांसाठी एक वेगळी जागा राखून ठेवावी; संग्रहालय स्थापावं, की ज्या ठिकाणी असं पुस्तक जमा करता येईल. तिथून अशी पुस्तकं संगणकीकरणाच्या प्रकल्पातही दाखल करता येतील. एकदा त्यांचं अशा रितीने संगणकीकरण झालं की मग वाळवी लागलेलं, खराब पुस्तक नष्ट करायला हरकत नाही; पण कोणीही परस्पर मनमानी पद्धतीने पुस्तकं नह करू नयेत.

तिसरी गोष्ट येथून पुढे प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांसाठी करावी लागेल. ती अशी प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रती ठरावीक ग्रंथालयांत जन कराव्यात असा नियम आहे. मुंबईच शासकीय ग्रंथालय, कलकत्त्याच आणि या ठिकाणी ही पुस्तकं जमा होतात; पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्याच आणखी पाच-सहा ग्रंथालयांना या पुस्तकाच्या प्रति पाठविण्याचा नियम करावा. या ग्रंथालयामध्ये या पुस्तकांची निगा नीट निगा राखली जाईल, जा याची काळजी घ्यावी. सध्याची शासकीय ग्रंथागारामध्ये येणाऱ्या पुस्तकसंग्रहांची स्थिती समाधानकारक नाही. कलकत्त्याच्या ग्रंथागारामध्ये येणाऱ्या अशा पुस्तकाचे काही काळापर्यंतचे कॅटलॉग तयार झालेत; पण मुंबईतलं काम फारसं समाधानकारक नाही. महाराष्ट्रातल्याच ग्रंथालयांमध्ये हे संग्रह असले तर अधिक बरं. अस केल्यास प्रकाशित झालेलं प्रत्येक मराठी पुस्तक निदान या ग्रंथालयांमध्ये तरी जतन करून ठेवलं जाईल. अशा रितीने इथून पुढचं प्रत्येक पुस्तक तरी जपलं जाईल. भविष्यात त्यांचं संगणकीकरण वगैरे गोष्टी शिस्तीत पार पडतील.

अर्थात ग्रंथालय संचालनालय भाषाविभागाकडे येईल, असं मी यात गृहीत पातं आहे. शिवाय भाषाविभागाकडे राज्य मराठी विकास संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून हे करता येईल. सध्या झालंय असं की ग्रंथांचं संवर्धन करण्याचं काम राज्य मराठी विकास संस्था करते आहे आणि महाराष्ट्रातली ग्रंथालयं उच्चशिक्षण विभागाकडे आहेत. हा गोंधळ मिटवला गेला पाहिजे.

इतरही अनेक लहानमोठ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रांचे संग्रह. वर्तमानपत्रं हलक्या प्रतीच्या न्यूजप्रिंट कागदावर छापली जातात. हा कागद लवकर नष्ट होतो. त्यांची संग्रहालयांतली अवस्था अत्यंत वाईट असते. यावरही प्रा. प्रियोळकरांनी उपाय सुचवला होता. तो म्हणजे, प्रत्येक वर्तमानपत्राने आपल्या दहा प्रती चांगल्या टिकाऊ कागदावर छापायच्या. या दहा प्रती सरकारने ठरवून दिलेल्या संग्रहालयांमध्ये जतन करण्यासाठी पाठवायच्या. त्या सहजपणे टिकतील.

अशा काही उपाययोजना करून ग्रंथसंवर्धनाचं मोठं काम उभारता येईल. अर्थात सरकारच्या सहकार्याशिवाय आणि पुढाकाराशिवाय हे शक्य नाही.

२६ ऑक्टोबर, २०२५

affix file modifications

दाखविणेत, देणेत, करणेत अशी क्रियापदांची रूपे आपण बोली भाषेत वापरत नसलो तरी लिखाणात आणि विशेषतः कायदेशीर लिखापढीत फार पूर्वीपासून वापरत वापरली जात आहेत. म्हणून ती स्पेलचेकच्या डेटाबेसमध्ये घ्यावी लागतील. त्यासाठी खाली दिलेल्या तीन सुधारणा अफिक्स फाईलमध्ये केल्या आहेत.

SFX M Y 44
SFX M णे विणे णे

Changed to:
SFX M Y 45
SFX M णे विणे णे
SFX M णे विणेत णे

SFX R Y 76
SFX R णे ाविणे/P णे

changed to:
SFX R Y 77
SFX R णे ाविणे/P णे
SFX R णे ाविणेत णे

SFX N Y 1
SFX N णे 0 णे

changed to:
SFX N Y 2
SFX N णे 0 णे
SFX N 0 त णे

३० सप्टेंबर, २०२५

Update Bengali Spell check

If the user types অধ্যায়ে, the spell checker suggests অধ্যায়ে, which visually appears identical. However, there is a difference at the Unicode level: the user input consists of two characters (য় = U+09AF + U+09BC), whereas the suggestion uses a single character (য় = U+09DF).

If the intention is to treat the user’s two-character input as correct, it is necessary to add a rule in the affix file as follows:

ICONV 1
ICONV য় য়

२७ सप्टेंबर, २०२५

विकीमिडीया फाउंडेशनचे भारतातील पैसे

गेल्या ६ ते ७ वर्षांत सुमारे आठ कोटी रुपये विकीमिडीया फाउंडेशनने भारतात पाठविले.  Centre for Internet and Society (India) या संस्थेच्या वेबसाईटवर हे आकडे कोणालाही पाहता येतील. 

https://cis-india.org/about/reports

मोदी सरकारने कायदा करून परदेशातून येणार्‍या पैशाचा ओघ उघड करण्याची सक्ती केली म्हणून आज आपण हे आकडे पाहू शकतो. २०१९ सालापूर्वी देखील काही पैसे त्यांनी पाठवले आहेत पण त्याची स्वतंत्र नोंद नाही.

2019 April - June 8844962
2019 Oct - Dec 2147512
2019 Oct - Dec 1044750
2020 Jan - March 5291569
2020 July - Sep 9290535
2021 July - Sep 10258483
2021 July - Sep 3794716
2022 Jan - March 4396493
2022 July - Sep 2280016
2023 April - June 4996699
2023 July - Sep 10416927
2024 Jan - March 7037034
2024 April - June 10228197

हे आकडे फक्त सप्टेंबर २०२४ पर्यंतचे आहेत.  गेल्या एक वर्षातील जमेचे आकडे  अद्याप वेबसाईटवर दिले गेलेले दिसत नाहीत. ज्या संस्थेकडे विकीचे पैसे जमा झाले ती संस्था म्हणजे वर उल्लेख केलेली CIS ही संस्थाच  १ मे २०२५ पासून बंद पडली आहे. तसे त्यांच्याच वेबसाईटवर मुख्य पानावर लिहिलेले आहे. त्याचा अर्थ गेल्या एक वर्षात किती पैसे विकीकडून आले ते समजणे आता अशक्य नाही पण अवघड आहे. मोझिला (फायरफॉक्स) या संस्थेने देखील २ कोटीची देणगी शैक्षणिक कामासाठी दिलेली दिसत आहे. स्वतः तोट्यात असताना हा प्रपंच त्यांनी का केला ते कळायला मार्ग नाही.  परदेशातील इतर काही संस्थांनी देखील पाच - पन्नास कोटी रुपये दिलेले असतील पण तो ह्या लेखाचा विषय नाही.

ह्या ८ ते १० कोटींचा अपहार झाला आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. माझा त्या संस्थेच्या संचालकांवर आणि विकीपीडिया साठी झटणार्‍या टीमवर पूर्ण विश्वास आहे. प्रश्न असा आहे इतका पैसा खर्च केल्यावरही मराठी/ हिंदी किंवा दक्षिण भारतातील इतर विकीपीडिया / विकीसोर्स यांची स्थिती अशी का आहे? बहुतेक सर्व स्वयंसेवक विकीसाठी आपला वेळ मोफत देतात असे सांगण्यात येते, ते खरेच तसे आहे का? कॉन्फरन्स खर्च, प्रवास भत्ता,  संगणक खरेदी अशा गोष्टी विकीसाठी कितपत फायदेशीर ठरल्या आहेत त्याचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची त्यांची तयारी आहे का? विकीवर प्रेम करणार्‍या जगभरातील देणगीदारांनी दिलेले हे पैसे आहेत त्यामुळे त्याविषयी बोलण्याचा मला नक्कीच अधिकार आहे. कारण विकीच्या दृष्टीने १ कोटी किंवा एक रुपया देणारा देणगीदार दोन्ही एकाच मापाचे आहेत. सामान्य माणसाचा आवाज हाच विकीपीडियाचा आवाज आहे. माझे योगदान नगण्य असले तरी मी प्रश्न तर नक्कीच विचारू शकतो.


१८ फेब्रुवारी, २०२५

हंस्पेलचा फायदा

हंस्पेलचा मला व्यक्तिशः काय फायदा झाला याचा मी विचार करतो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भाषेकडे पाहण्याची एक विशाल दृष्टी मला या प्रोजेक्टने दिली.  इंग्रजीत ज्याला  "birds eye view" म्हणतात अशी दृष्टी. म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा विमानातून जमिनीकडे पाहता तेव्हा तुम्हाला शेकडो किलोमीटर परिसर एकाच नजरेत दिसतो.  गाव/ तालुका  वेगळे ओळखू येत नाहीत. जमिनीच्या हद्दीवरून होणारी भांडणे विमानातून पाहताना क्षुद्र वाटू लागतात.  आता असा विचार करा की तुमचे विमान आकाश ओलांडून अंतराळात गेले आहे. तिथून तर संपूर्ण पृथ्वी पाहता येते की नाही?  ह्या प्रोजेक्टने जवळपास संपूर्ण जगातील भाषा कवेत घेतल्या आहेत,  त्यातील आंतर-संबंध उलगडून दाखविले आहेत आणि त्यातील साम्यस्थळे अधोरेखित केली आहेत.  भाषेच्या अभ्यासकांना हंस्पेल हा विषय निदान २ मार्कांसाठी तरी ठेवला गेला पाहिजे असे मला वाटते. त्यातून भाषेकडे पाहण्याची एक वेगळी आणि विशाल दृष्टी मिळेल. तिचा आपल्याला इतर ठिकाणी देखील फायदा होईल. मी हिंदी भाषेतील स्पेल चेक बनविला, त्यावरून मायबोलीवरील एका सदस्याने टीकेचा अक्षरशः भडिमार केला तो येथे वाचता येईल.

https://www.maayboli.com/node/67422?page=4

वास्तविक हिंदी आणि मराठी एकाच भाषेपासून बनलेल्या असल्यामुळे त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत गेला आहे. एकमेकांना न संपवता सहजीवन जगता येणे वाटते तितके कठीण अजिबात नाही हे मी हंस्पेलच्या अभ्यासातून शिकलो.  भाषेचा भूतकाळ आणि त्याची वर्तमानाकडे झालेली वाटचाल याचा अभ्यास करणार्‍यांसाठी हा प्रोजेक्ट म्हणजे एक चांगले साधन आहे.

एखाद्याला कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथानंतर भाषेला सूत्ररूपात मांडण्याचा हंस्पेल हा एक महत्त्वाचा प्रयोग आहे.  हंस्पेलच्या फॉरमॅटमध्ये कोणतीही भाषा बसविताना शब्दांचा ल. सा. वि. काढावा लागतो आणि त्याला टॅग जोडावा लागतो. पाणिनीने देखील अशाच प्रकारे संस्कृत भाषेची बांधणी केली त्यामुळे तिचा विस्कळीतपणा जाऊन त्याला बांधेसूदपणा आला. संस्कृतच्या अभ्यासकांचे पाणिनी शिवाय पान देखील हलत नाही तसे काहीसे हंस्पेलच्या बाबतीत भविष्यात होऊ शकते. हंस्पेलच्या फॉरमॅटमधील पर्शियन (फारसी) भाषेची अफिक्स फाईल पाहिली तर आपल्या लक्षात येते की त्या भाषेची रचना देखील इतर इंडो-युरोपीयन भाषांसारखीच आहे. खाली दिलेल्या दुव्यावर सर्व भाषा पाहता येतील.  पहिली दोन अक्षरे भाषा दर्शवितात तर नंतरची दोन अक्षरे देश. (उदा. mr_IN म्हणजे मराठी_इंडिया)

https://github.com/LibreOffice/dictionaries/

उजवीकडून डावीकडे लिहिल्यामुळे पर्शियन लिपी दुर्बोध झाली तरी भाषेचा डी. एन. ए.  इतर भाषांशी मिळता-जुळता आहे.  फक्त अफिक्स फाईल पाहून आपण काही निष्कर्ष काढू शकतो. उदा. संस्कृतमध्ये कोणतेही दोन शब्द एकमेकांना जोडून संधी शब्द बनविता येतो. तसे जगातील इतर कोणत्या भाषेत शक्य आहे? या प्रश्नाचे उत्तर ह्या साध्या कमांडने देता येईल. 

# find . -name "*.aff" -exec grep -i -l "^compoundbegin" {} \;

डॅनिश (डेन्मार्क), जर्मन, क्रोएशियन, हंगेरियन, नॉर्वेजियन, कोरियन, स्विडिश, फारसी, डच, इस्टोनियन अशा ८ ते १० भाषा संस्कृत  सारखी संधी करू शकतात. कारण  "कंपाऊंड-बिगिन" हा टॅग जर त्या भाषेच्या अफिक्स फाईलमध्ये असेल तर त्याचा अर्थ ती भाषा शब्दाची संधी करू देते असा होतो.